दहा लाखपर्यंत कर्ज मिळते माहिती आहे ना
नोकरी शोधण्यापेक्षा उद्योग, व्यवसायांकडे यावे व स्वतःचे उद्योग उभे करून स्वावलंबी व्हावे. त्याचबरोबर उद्योग उभे करून रोजगार निर्माण करावा. राज्य सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती ही योजना सुरू केली आहे.
त्यानुसार सातवी उत्तीर्ण असलेल्यांना १० लाखांचे तर दहावी उत्तीर्ण बेरोजगारांना २५ लाखांपर्यंत कर्ज देण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यात यंदा दीड हजार बेरोजगारांना कर्ज देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यातील ग्रामीण व शहरी भागात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
*अर्ज कोठे कराल?*
अर्जदाराने
@marathiloanconsultancy
संकेतस्थळावर अर्ज करावा.
कोणाला किती कर्ज?
उद्योगांसाठी अर्जदार हा किमान ७ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
दहावी उत्तीर्णाला २५ लाखांपर्यंत तर २५ लाखांपेक्षा जास्त खर्चाच्या उद्योगांसाठी अर्जदाराची शैक्षणिक पात्रता किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
निष्कर्ष काय?
■ या योजनेत कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल.
■ आर्थिक साहाय्य केवळ नवीन प्रकल्प, उद्योगांसाठी उपलब्ध असेल.
■ नोंदणीकृत स्वयंसहायता गट आर्थिक मदतीसाठी पात्र आहे.
■ महिलांना वार्षिक लक्ष्यामध्ये ३० टक्के आरक्षण असेल.
■ तरतुदीनुसार दिव्यांग अर्जदारास ३ टक्के आरक्षण असेल.
*ही कागदपत्रे आवश्यक*
फोटो, आधारकार्ड, रहिवासी दाखला, जन्मदाखला, शैक्षणिक प्रमाणपत्र, संकेतस्थळावरील प्रतिज्ञापत्र, प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, पॅनकार्ड, ग्रामीण भागात प्रकल्प असल्यास ग्रामपंचायतीचा दाखला इत्यादी कागदपत्राची आवश्यकता आहे.
https://shetkari177.blogspot.com/2023/07/blog-post_10.html
Comments
Post a Comment